महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : रहिवाशांची घरपट्टी निम्मी करण्याची घोषणा ठरणार ‘गेम चेंजर’!

नगरपरिषदेच्या उत्पन्नातील तूट शासनाकडून भरून काढण्याचा मंत्री अदिती तटकरे यांचा शब्द**

महाड – नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा गाठताना महाडमध्ये राज्याच्या महिला व बालविकास मंत्री कुमारी अदिती तटकरे यांनी केलेली मोठी घोषणा चर्चेत आली आहे. महाड शहरातील घरपट्टी निम्मी करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला असून ही घोषणा निवडणुकीत ‘गेम चेंजर’ ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

महत्वाचे म्हणजे, घरपट्टी कमी झाल्याने नगरपरिषदेच्या उत्पन्नात निर्माण होणारी तूट शासन भरून काढेल, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

महाडमध्ये घेतलेल्या एनसीपी-बीजेपी संयुक्त पत्रकार परिषदेत अदिती तटकरे म्हणाल्या, “राजकीय मतभेद असले तरी आम्ही महायुतीचा भाग आहोत. मी कोणाच्याही मतदारसंघात हस्तक्षेप करत नाही. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, आणि एकनाथ शिंदे या तिन्ही नेत्यांचे मला पहिल्या मंत्रीपदापासून सातत्याने सहकार्य मिळाले.”

त्या पुढे म्हणाल्या की, एकमेकांवर टीका करून फायदा होत नाही; लोकांना मूलभूत सुविधा आणि विकास महत्त्वाचा वाटतो.

पूरस्थितीनंतर प्रादेशिक पर्यटन विकासातून अनेक कामांसाठी निधी मंजूर केल्याची माहिती तटकरे यांनी दिली. महाड शहरातील जिल्हा परिषदेच्या पडीक जागेवर कौशल्य विकास केंद्र, गाळे, शासकीय कार्यालये उभारण्याचा प्रस्तावही तटकरे यांनी स्पष्ट केला. त्यामुळे जिल्हा परिषद आणि नगर परिषद—दोन्ही संस्थांना रेव्हेन्यू शेअरिंग द्वारे उत्पन्न मिळेल.

चवदार तळ्यातील परिसरावर बोलताना तटकरे म्हणाल्या, “महाडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर माहिती देणारे केंद्र नाही. पुढील काळात आम्ही ते उभारू शकतो. येथील अनुयायांची मोठी गर्दी लक्षात घेतल्यास हा परिसर शहराच्या अर्थव्यवस्थेला महत्त्वाचा ठरेल.” “केवळ MIDC वर अवलंबून राहता कामा नये,” असे सांगत तटकरे यांनी चवदार तळे, वीरेश्वर देवस्थान, पर्यटक आणि भाविक यांच्या संख्येमुळे शहरातील मार्केटची उलाढाल वाढेल आणि रोजगार संधी निर्माण होतील, असे नमूद केले.

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात