फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच महाराष्ट्राची जातीपातीत विभागणी – संजय राऊत
Twitter : @NalavadeAnant मुंबई देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच महाराष्ट्र जातीपाती वाटला गेला, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना केला. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात धार्मिक मुद्द्यांवरून दोन समाजात संघर्ष झाला. राज्यात विविध ठिकाणी सामाजिक अशांतता आहे. या मुद्द्यावरून राऊत यांनी भाजपवरही निशाणा साधला. […]