लोकशाहीचे रक्षण व मतदारांच्या हक्कासाठी काँग्रेसचे आंदोलन: नाना पटोले
मुंबई : विधानसभा निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यांचा निषेध करत, लोकशाही आणि मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस पक्ष २५ जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर आंदोलन करणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी ही घोषणा केली. पटोले म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर फक्त सहा महिन्यांत ५० लाख नवे मतदार कसे आले? मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ नंतर ७६ […]