राज्यातील १२ जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्ष व १२५ पंचायत समित्यांमध्ये सभापती पदांच्या निवडणुका २० मार्चपूर्वी
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांमधील तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका ७ फेब्रुवारी रोजी पार पडल्या. निवडणुकांनंतर पंधरा दिवसांहून अधिक कालावधी लोटल्यानंतर राज्याच्या ग्रामविकास विभागाने २० मार्च २०२६ पूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पहिल्या बैठका आयोजित करण्याचे निर्देश राज्यातील जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना दिले […]
