आखाती युद्धाचा फटका मराठवाड्याला; केळी-कांद्याला भाव घसरल्याने शेतकरी संकटात
आखाती देशांमध्ये पेटलेल्या संघर्षाची झळ आता थेट मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसू लागली आहे. केळी आणि कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने स्थानिक बाजारपेठेत दर कोसळले असून, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. धाराशिव जिल्ह्यात एका शेतकऱ्याने कांदा पिकावर नांगर फिरवला, तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात केळीचे घड जनावरांना खाण्यासाठी टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ही परिस्थिती मराठवाड्यातील शेती […]
