पुणे-पिंपरी महापालिकांना विखे पाटील यांचा इशारा; पाणी पुनर्वापर न केल्यास कारवाई
मुंबई: पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका आपल्या गरजेपेक्षा जास्त पाणी वापरत असून पाणी पुनर्वापर (रिसायकलिंग) करत नसल्यामुळे कृषी क्षेत्रावर अन्याय होत आहे, असा गंभीर मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोन्ही महापालिकांना खणखणीत इशारा दिला. “महापालिकांनी तातडीने आपल्या पाणी व्यवस्थापन प्रणालीत सुधारणा करावी, अन्यथा कारवाई करावी लागेल,” असे स्पष्ट शब्दांत मंत्री विखे […]
