मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावीत – मंत्री नितेश राणे यांचे निर्देश
मुंबई – रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प हा स्थानिक रोजगारनिर्मिती वाढवण्यासाठी आणि मत्स्यउत्पादनाला चालना देण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मासेमारीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित होतील. हा प्रकल्प रत्नागिरीच्या विकासात ‘मैलाचा दगड’ ठरेल, असे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले. तसेच, या प्रकल्पाची कामे निर्धारित कालावधीत गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे […]