धरण भागवते शहरांची तहान… पण कुशीतील १२ गावपाडे आजही तहानलेले
बारवी प्रकल्पग्रस्तांची ५५ वर्षांची प्रतीक्षा अजूनही संपलेली नाही गोपाळ पवार | मुरबाड मुरबाड : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या कुशीतील बारा गावपाड्यांची अवस्था आजही तहानलेलीच आहे. शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या या धरणामुळे कायमची मिटली असताना, धरणबाधित गावांमध्ये मात्र “दिव्याखाली अंधार” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याने भरलेले धरण शेजारी असूनही पाण्यासाठी विहिरीत उतरून चिखलातून […]
