विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात वाघ अभयारण्य, इतरत्र बिबट अभयारण्य; मृतांच्या कुटुंबीयांना नोकरी देणार
मुंबई : राज्यात वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबा धर्तीवर वाघ अभयारण्य उभारण्यात येईल, तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये बिबट्यांसाठी स्वतंत्र अभयारण्ये निर्माण केली जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी विधानसभेत केली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा नियम १०५ अंतर्गत लक्षवेधी सूचना मांडताना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर झालेल्या […]
