मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भातील उच्चस्तरीय बैठकीत वरिष्ठ मंत्री आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करताना. महाराष्ट्र ताज्या बातम्या

शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करूनच पवना जलवाहिनी प्रकल्प राबविणार; २०५० पर्यंतच्या जलआराखड्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे-पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील पाणीगरजा लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजनावर भर मुंबई : पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेशातील वाढत्या पाणीगरजा लक्षात घेऊन राज्य सरकारने पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्पाबाबत महत्त्वाची भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांची संमती, विश्वास आणि संवादाशिवाय हा प्रकल्प पुढे नेला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. याचबरोबर, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या २०५० पर्यंतच्या पाणीपुरवठ्याचा सर्वसमावेशक […]

विधानसभेत मुंबईच्या डिसॅलिनेशन प्रकल्पाबाबत माहिती देताना उद्योगमंत्री उदय सामंत. महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुंबईच्या पाणीसुरक्षेसाठी ४,०७७ कोटींचा ‘डिसॅलिनेशन’ प्रकल्प; मनोरीत समुद्राच्या पाण्यापासून मिळणार गोडे पाणी

२०० एमएलडी क्षमतेचा प्रकल्प; ४८ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य मुंबई : मुंबईच्या वाढत्या पाणीगरजा आणि भविष्यातील जलसुरक्षेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, पश्चिम उपनगरातील मालाड येथील मनोरी येथे ४,०७७ कोटी रुपयांचा २०० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) क्षमतेचा समुद्राच्या पाण्याचे नि:क्षारीकरण (Desalination) प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी विधानसभेत ही माहिती दिली. मुंबईला […]