महाराष्ट्र ताज्या बातम्या

हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी निवड

बुलढाणा– ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि सर्वोदयी कार्यकर्ता हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ग्रामस्वराज्य, जलसंधारण, स्वच्छता आणि युवक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिलेल्या सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य काँग्रेसला नव्या दिशा व बळ मिळेल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.

राजकीय आणि सामाजिक योगदान

गांधी, विनोबा, गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज यांच्या विचारसरणीवर कार्य करणारे हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेसमध्ये राजीव गांधी पंचायत राज संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कार्य केले आहे. तसेच, गुजरात, मध्यप्रदेश आणि पंजाबच्या काँग्रेस प्रभारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

२०१४ ते २०१९ दरम्यान बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले सपकाळ १९९९ मध्ये महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद महाराष्ट्रात अव्वल स्थानावर होती.

नवे आव्हान आणि पक्षसंघटनेत बळकटी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्तीनंतर सपकाळ यांच्यासमोर पक्ष संघटनेला नव्या उमेदीने मजबूत करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपातळीवरील काँग्रेस बळकट करण्यावर त्यांचा भर असेल.

सामाजिक चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदान

ग्रामस्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्यांनी महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानास मोठी चालना दिली. जलसंधारण, जलव्यवस्थापन आणि आदिवासी समुदाय सक्षमीकरणासाठी त्यांनी गेल्या २५ वर्षांपासून अथक प्रयत्न केले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहिमा, पाणीटंचाई निवारण उपक्रम आणि युवकांसाठी प्रेरणादायी शिबिरे आयोजित केली आहेत.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनुभव

१९९६ मध्ये भारताच्या वैश्विक मैत्री अभियानांतर्गत जपानमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व त्यांनी केले होते. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात संविधान जागृती मोहिम राबवली.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला राज्यात नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या सामाजिक आणि राजकीय अनुभवाच्या जोरावर आगामी काळात महाराष्ट्र काँग्रेसला बळकटी देण्याच्या दिशेने मोठी वाटचाल होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात