महाराष्ट्र ताज्या बातम्या

३१ मेपूर्वी रस्ते कामे पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरळीत करावीत – अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

मुंबई – पावसाळ्यापूर्वी मुंबईतील नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सध्या सुरू असलेली सर्व रस्ते काँक्रिटीकरण कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करून ती वाहतुकीसाठी सुरक्षित स्थितीत आणावीत, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण प्रकल्पांतर्गत पेव्हमेंट क्वालिटी काँक्रिट (PQC) कामे २० मे २०२५ पासून थांबवण्यात आली आहेत. त्यानंतर कोणतीही नवीन काँक्रिटीकरणाची कामे सुरु करण्यात येऊ नयेत, असेही आदेश देण्यात आले आहेत.

अधिकार्‍यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, २० मेनंतर सुरू असलेली अपूर्ण कामे मास्टिक अस्फाल्ट पद्धतीने पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी योग्य करावेत. तसेच, रस्ता खुला करण्यापूर्वी संबंधित पावसाळी जलवाहिन्या आणि सांडपाणी वाहिन्या (storm water drains आणि sewer manholes) स्वच्छ करून, पाण्याचा प्रवाह सुरळीत आहे याची खातरजमा केली जावी.

कंत्राटदारांना सक्त सूचना
कामाची गती वाढवण्यासाठी निर्देश देताना श्री. बांगर यांनी सांगितले की, २५ मे २०२५ पर्यंत मास्टिक अस्फाल्टचे काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदारांकडून काम काढून घेऊन, इतर पात्र कंत्राटदारामार्फत ते पूर्ण करावे. यासाठीचा खर्च मूळ कंत्राटदाराच्या जोखमीवर व दुप्पट दंडासहित वसूल केला जाईल. हे काम ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक असेल.

पावसाळी तयारीसाठी तपशीलवार उपाययोजना
रस्त्यांलगतच्या जलवाहिन्यांची जोडणी, पाण्याचा मुक्त प्रवाह, सांडपाणी झाकणांची स्थिती याबाबत वॉर्ड कार्यालये आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे तपासणी करावी. झाकणं तुटलेली किंवा हरवलेली असल्यास ती तात्काळ बदलावी.

तसेच, कामादरम्यान पडलेला राडारोडा, बांधकाम साहित्य इत्यादी त्वरित हटवावे. सर्व पर्जन्य जलवाहिन्या, सांडपाणी झाकणे आणि मनुष्यप्रवेशिका यांची सफाई आणि कार्यस्थिती सुनिश्चित करण्यात यावी, असेही निर्देश आहेत.

नियोजनबद्ध कामगिरीवर भर
रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३१ मेपूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री तैनात करावी. तसेच, दररोजची प्रगती Google Sheet वर अपडेट करून त्याचा आढावा घेतला जावा, असेही आदेश श्री. बांगर यांनी दिले आहेत.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी सुरू असलेली ही कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करून मुंबईकरांना सुरक्षित आणि सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात