महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : गुळगुळीत रस्ता आणि तीव्र उतार ठरतोय अपघातांना कारणीभूत; आठवड्यातील सातवा अपघात

महाड : महाड-दापोली राज्य मार्गावर कुरले गावाजवळ मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन एसटी बस एकमेकांवर आदळल्याने नऊ प्रवासी जखमी झाले. जखमींमध्ये दोन बस चालक, एक वाहक आणि सहा प्रवाशांचा समावेश असून त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही धडक पुण्याहून येणारी ‘फौजी आंबवडे पुणे’ बस आणि महाडहून निघालेली ‘महाड फौजी आंबवडे’ बस यांच्यात झाली. मुसळधार पावसामुळे रस्ता गुळगुळीत झाला होता आणि उतारावर नियंत्रण गमावल्याने दोन्ही बस समोरासमोर आदळल्या.

या मार्गावर गेल्या आठ दिवसांत दोन एसटी बससह एकूण सात अपघात झाले आहेत. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत दोषी ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

गुळगुळीत डांबरीकरण आणि स्पीड ब्रेकरचा गोंधळ

महाड-दापोली मार्गाचे डांबरीकरण अत्यंत गुळगुळीत पद्धतीने झाले असून पावसात रस्ता अधिकच निसरडा बनतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकतेच या मार्गावर खडी टाकून रोलरने दाबण्याचा प्रयोग केला, परंतु तोही निष्फळ ठरला.

याशिवाय, अपघात प्रवण भागांवर स्पीड ब्रेकर टाकण्यात आले, मात्र त्यावर सूचना फलक किंवा स्पष्ट पांढरे पट्टे नसल्याने ते वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. पावसामुळे हे पट्टे वाहून गेले असून यामुळे पुन्हा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे, असे वाहनचालकांचे म्हणणे आहे.

ठेकेदारावर कारवाईची मागणी, अन्यथा आंदोलन

या अपघातांबाबत गिरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी ठेकेदारासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरत, ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Avatar

Milind Mane

About Author

मिलिंद माने (Milind Mane) हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार असून कोकण विभागातील राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंड आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात