महाराष्ट्र ताज्या बातम्या

“दालनात कुणाचे फोटो असणार?” – छगन भुजबळ यांचा अधिकाऱ्यांना सवाल, पत्रकारांशी दिलखुलास गप्पा

मुंबई : गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याकडे शुक्रवारी पुन्हा अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवण्यात आले. याचबरोबर मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरचं, पूर्वी धनंजय मुंडे यांच्याकडे असलेलं दालनही त्यांच्याकडे देण्यात आलं.

आज त्याच दालनात पहिल्यांदाच दाखल झालेल्या भुजबळ यांना माध्यमांनी तिथेच गाठलं. कायम दिलखुलास आणि मिश्कील शैलीसाठी ओळखले जाणारे भुजबळ यांचा मूड प्रसन्न होता. त्यामुळे पत्रकारांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला त्यांनी सडेतोड आणि मिश्कील उत्तरं देत उपस्थितांना खदखदून हसवलं.

त्यांच्याकडे पहिला प्रश्न होता — “आता या दालनात कोणते फोटो लावणार?” त्यावर हसत उत्तर देत भुजबळ म्हणाले, “अहो, ही काय विचारायची गोष्ट आहे का? शाहू, फुले, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपती, आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सगळ्यांचे फोटो लावणार!” थोडं थांबत ते पुढे म्हणाले, “अरे हो! माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटोही लावणार आहे.”

एवढ्यावरच न थांबता जेव्हा पत्रकारांनी विचारलं की, “आणखी कोणाचे फोटो?” तेव्हा मोठ्याने हसत भुजबळ म्हणाले, “तुम्हाला हवं असेल तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार साहेबांचेही फोटो लावायला मला काही हरकत नाही!” इतकं म्हणताच दालनात हास्याची कारंजी उसळली.

क्षणभर भुजबळही मंत्रिपदाच्या जबाबदारीतून बाहेर पडल्यासारखे वाटले, पण लगेचच त्यांनी आपली भूमिका आठवली. थोडसं गंभीर होत त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाहत विचारलं, “काय हो, त्या तसबिरी कुठे आहेत?”

तेवढ्यात आधीच थोडे गोंधळलेले अधिकारी थोडेसे अवघडले. पण भुजबळ हसत म्हणाले, “चला, आजचा पहिलाच दिवस आहे, आनंदाने घ्या.” त्यावर उपस्थित अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकत हलकंsmile केलं.

या प्रसंगात भुजबळ यांनी सर्वांचा सन्मान राखण्याची भूमिका घेतली आणि पुन्हा एकदा त्यांच्या संतुलित राजकीय दृष्टिकोनाची झलक दिली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात