महाराष्ट्र ताज्या बातम्या

दाऊदलाही भाजपात प्रवेश देणार का?: काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

मुंबई: “भाजपाला आता इतकी नैतिक अधोगती आली आहे की उद्या कुख्यात माफिया दाऊद इब्राहिमलाही पक्षात घेतील काय?” असा संतप्त सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले, “भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो, पण सध्या या पक्षात कोणत्याही पातळीवर कोणीही प्रवेश करू शकतो. ज्यांच्यावर कधी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच मंत्रीपद देण्यात आले. आता तर अशा व्यक्तीलाही पक्षात घेतले आहे, ज्याच्याबाबत खुद्द भाजप आमदाराने दाऊद इब्राहिमच्या गुंडांशी संबंध असल्याचा आरोप केला होता.”

नाशिकचे सुधाकर बडगुजर यांचा उल्लेख करत सपकाळ म्हणाले, “भाजप आमदार नितेश राणे यांनी बडगुजर यांनी दाऊदचा गुंड सलीम कुत्ता याच्यासाठी पार्टी दिल्याचे विधानसभेत गंभीर आरोप करत फोटोही दाखवले होते. आता मात्र त्याच बडगुजर यांचा भाजपमध्ये सन्मानाने प्रवेश होत आहे आणि त्याचे स्वागतही करण्यात येत आहे. मग उद्या दाऊद हिंदुत्व स्वीकारेल, म्हणून त्यालाही भाजपात घेणार काय?”

सपकाळ पुढे म्हणाले, “भाजप हा ‘पार्टी विथ डिफरन्स’ नसून, आज तो गुंड, मवाली, भ्रष्टाचारी यांचा पक्ष झाला आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणातील प्रफुल्ल पटेलांसारख्यांशी सत्तेत भागीदारी करत भाजप त्यांनाही ‘वॉशिंग मशीन’मधून स्वच्छ करतो. हेच भाजपचे खरे बेगडी हिंदुत्व आहे.”

ते म्हणाले, सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनाही माहिती नव्हती, त्यामुळे भाजप कोण चालवतंय हेच कळेनासं झालं आहे.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात