महाराष्ट्र ताज्या बातम्या

हिंदी सक्तीच्या वादामागे फडणवीस-राज ठाकरे यांची मिलीभगत – नाना पटोले यांचा आरोप

”मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतरच वादग्रस्त जीआर कसा काढला?”

मुंबई: राज्यातील ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे लक्ष हटवण्यासाठीच राज्य सरकारने हिंदी सक्तीचा मुद्दा जाणीवपूर्वक उकरून काढला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीनंतरच राज्य सरकारने हिंदी सक्तीबाबतचा वादग्रस्त शासन निर्णय (जीआर) काढला, ही बाब संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणामागे फडणवीस-राज ठाकरे यांची मिलीभगत असल्याचा दावा त्यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींसाठी २१०० रुपये आर्थिक सहाय्य यासारख्या मागण्या प्रलंबित आहेत. बेरोजगारी, महागाई या मुद्द्यांवर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारकडे ना उत्तरं आहेत ना निधी, म्हणूनच जनतेचा रोष वेगळ्या दिशेने वळवण्यासाठी हिंदी भाषेचा मुद्दा उभा करण्यात आला आहे.”

पटोले पुढे म्हणाले, “मराठी भाषा आणि संस्कृती जपलीच पाहिजे, आणि पहिलीपासून विद्यार्थ्यांवर हिंदीचे ओझे टाकणे अयोग्य आहे, यावर कोणाचेही दुमत नाही. मात्र, हा मुद्दा शैक्षणिक न राहता राजकीय रंगात रंगवला गेला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी हिंदी सक्ती न करण्याची भूमिका घेतली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर लगेचच वादग्रस्त शासन निर्णय का निघाला, याचे उत्तर सरकारकडे असले पाहिजे.”

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मतांचे ध्रुवीकरण घडवून भाजप आणि मनसेला त्याचा राजकीय फायदा करून देणे हाच खरा उद्देश असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. “मी मारल्यासारखं करतो, तू रडल्यासारखं कर — असा प्रकार सध्या सरकार करत आहे,” अशी टीका त्यांनी यावेळी केली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात