महाराष्ट्र ताज्या बातम्या

मालाड नागरी निवारा वसाहतीतील मूल्यांकन रक्कम १% करण्याचा विचार; नियमावली पावसाळी अधिवेशनाअखेर तयार होणार – महसूलमंत्री बावनकुळे यांचे विधानसभेत आश्वासन

मुंबई – मालाड पूर्वेतील शंभर टक्के मराठी भाषिक नागरी निवारा वसाहतीच्या 113 सहकारी गृहनिर्माण संस्थांतील मूल्यांकन रक्कम 10 टक्क्यांवरून 1 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासंदर्भात, तसेच GR (शासन निर्णय) सुटसुटीत करणे, अभय योजना लागू करणे आणि संबंधित इतर बाबींविषयी नियमावली तयार करण्याचे काम चालू असून, ती पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी पूर्ण केली जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिले.

ही लक्षवेधी सूचना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभा नियम 105 नुसार उपस्थित केली होती. त्यांनी सांगितले की, 7 जुलै 2017 रोजीच्या शासन निर्णयानुसार एक टक्क्यापेक्षा कमी रक्कम आकारता येऊ शकते. त्यामुळे त्यानुसार तातडीने कारवाई व्हावी, अशी त्यांची आग्रही मागणी होती.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य शासनाची मराठी भाषिकांना सहकार्याची भूमिका असल्याचे नमूद करत येथेही तीच भूमिका अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले. भाजप आमदार अमित साटम व अतुल भातखळकर यांनी लक्ष वेधले की, जिल्हाधिकारी कार्यालयांकडून परवानगी देण्यात विलंब होत असून, नियम क्लिष्ट आहेत. एकदा ठराविक रक्कम भरल्यानंतरही पुन्हा सहा-सहा कोटी रुपयांची मागणी केली जात असल्याचा अनुभव येत आहे.

आमदार योगेश सागर यांनी प्रश्न उपस्थित केला की, “वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी एक नियम आणि सामान्यांसाठी दुसरा नियम का असावा?”.

या सर्व मुद्द्यांवर उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, कालबद्ध निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, तसेच नियमावली सुलभ व समजण्यास सोपी केली जाईल, असे विधानसभेत स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात