महाराष्ट्र ताज्या बातम्या

गिरगाव चौपाटीला ‘राष्ट्रीय स्मारक’ दर्जा देऊन ‘स्वराजभूमी’ नामकरण करावे – सुनील प्रभू यांची विधानसभेत मागणी

मुंबई – भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे गिरगाव चौपाटीवरील समाधीस्थळ ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून घोषित करून त्याचे ‘स्वराजभूमी’ असे नामकरण करण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली.

आ. प्रभू म्हणाले की, लोकमान्य टिळकांच्या अंत्यसंस्कारासाठी गिरगाव चौपाटीचे मैदान निवडण्यात आले होते, आणि त्याच ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. हे स्थान केवळ ऐतिहासिक नाही, तर तेथील ऊर्जा आणि प्रेरणा आजही राष्ट्रवाद जागवणारी आहे.

मुंबई महापालिकेने 18 ऑगस्ट 2011 रोजी एकमताने ठराव संमत करून या स्थळाला ‘राष्ट्रीय स्मारक’ म्हणून मान्यता देण्याची शिफारस शासनाकडे केली होती. त्यानंतरही हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर 2015 मध्ये शासन निर्णय जाहीर झाला, तरीही स्मारकाचा दर्जा आणि स्वराजभूमीचे नामकरण अद्याप झालेले नाही, हे अत्यंत दुर्दैवी व अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे प्रभूंनी स्पष्ट केले.

या ऐतिहासिक स्थळाचा गौरव राखण्यासाठी आणि लोकमान्य टिळकांच्या स्मृतीला योग्य न्याय देण्यासाठी शासनाने तातडीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात