महाराष्ट्र ताज्या बातम्या

वीज पडण्याच्या घटनांवर नियंत्रणासाठी नवे ॲप विकसित करणार – आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – राज्यात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून, यासाठी ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ या ॲप्सद्वारे पूर्वसूचना दिली जाते. मात्र नागरिकांपर्यंत ही माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचावी यासाठी नवीन ॲप विकसित करण्यात येणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

आमदार समीर कुणावार यांनी वीज पडून होणाऱ्या मृत्यूंबाबत प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत भास्कर जाधव, संतोष दानवे आणि विजय वडेट्टीवार यांनीही सहभाग घेतला.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, पावसाळ्याच्या काळात शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना वीज पडण्याचा अधिक धोका असतो. मुसळधार पावसात वीज कोसळणे व वादळी परिस्थितीमुळे अनेकदा गंभीर घटना घडतात.

या पार्श्वभूमीवर भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्थेने (IITM) विकसित केलेले ‘दामिनी’ आणि ‘सचेत’ हे दोन्ही ॲप्स ४० किलोमीटरच्या परिसरात वीज पडण्याची पूर्वसूचना देतात. राज्य सरकारच्या विविध विभागांमार्फत या ॲप्सचा प्रचार व प्रसार करण्यात येतो.

महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन मध्ये वीज पडून 236 जणांचा मृत्यू झाला, सन मध्ये हा आकडा 181 वर आला.

ते म्हणाले की, अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना शासन आपत्ती मदत निकषांनुसार 4 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देते, तसेच गंभीर जखमींनाही मदत केली जाते.

नवीन ॲप विकसित करून अधिक अचूक व तत्काळ सूचना देण्याची प्रणाली उभारली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याद्वारे भविष्यात जीवितहानी टाळण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात