महाराष्ट्र ताज्या बातम्या

वनजमीनीवरील अतिक्रमणकर्त्यांविरुद्ध दोन महिन्यांत फौजदारी कारवाई — वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा

मुंबई – राज्यातील वनजमीनींवर अनधिकृतपणे उभारलेली धार्मिक स्थळे आणि इतर अतिक्रमणांची सखोल चौकशी करून येत्या दोन महिन्यांत संबंधित अतिक्रमणकर्त्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी आज विधानसभेत केली.

भाजप आमदार प्रवीण दटके यांनी विधानसभा नियम क्रमांक १०५ अन्वये या मुद्द्यावर लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

यावर उत्तर देताना मंत्री नाईक म्हणाले, “वनजमिनींवर अतिक्रमण करून धार्मिक स्थळे उभारणाऱ्या संस्था तसेच त्यामध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये सहकार्य करणारे किंवा निष्काळजीपणा करणारे अधिकारी सुद्धा कारवाईपासून सुटणार नाहीत. त्यांच्यावरही चौकशी करून आवश्यक ती कठोर पावले उचलली जातील.”

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील कोंदेगाव येथील वन विभागाच्या सर्व्हे क्रमांक ६३ आणि ६४ या जमिनींवर धार्मिक आणि शैक्षणिक संस्थेचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले असून परप्रांतीय लहान मुलांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचा धक्कादायक आरोप आमदार दटके यांनी यावेळी केला.

यासंदर्भात ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, याकडेही दटके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात