महाराष्ट्र ताज्या बातम्या

एसटी भांडार खरेदी गैरव्यवहारात २२ जण दोषी; १५ जणांवर निलंबनाची कारवाई होणार – परिवहन मंत्री सरनाईक यांची माहिती

मुंबई – पुण्यातील दापोडी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या विशेष लेखापरीक्षणात २२ अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी अद्याप सेवेत असून उर्वरित सात जण सेवानिवृत्त झाले आहेत. दोषी ठरलेल्या १५ कर्मचाऱ्यांवर मासिक वेतनाच्या १० टक्के कपात करण्यात आली असून त्यांच्यावर लवकरच निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत दिली.

भाजप आमदार संदीप क्षीरसागर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात या प्रकरणावर सरकारचे उत्तर मागितले होते. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांमध्ये, “दापोडी भांडार खरेदी प्रकरणात विशेष लेखा परीक्षणाचा निर्णय घेण्यात आला होता का?”, “लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इतर ठिकाणीही अनियमितता आढळून आली आहे का?”, आणि “माजी महाव्यवस्थापक (भांडार व खरेदी) यांच्याविरोधातही चौकशी सुरू आहे का?”, असे मुद्दे उपस्थित करण्यात आले होते.

या प्रश्नांना उत्तर देताना परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, “दापोडी, पुणे येथील मध्यवर्ती कार्यशाळा तसेच चिकलठाणा, संभाजीनगर आणि सातारा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या वरिष्ठ भांडार अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी राष्ट्रीय परिवहन महामंडळाकडून करण्यात येणार आहे. गैरव्यवहार गंभीर स्वरूपाचा असून, सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

या कारवाईमुळे एसटी महामंडळातील भांडार आणि खरेदी विभागातील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात