महाराष्ट्र ताज्या बातम्या

जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार!

फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर घाला – ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबई – महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडीने कडवट भूमिका घेत न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. या विधेयकामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये आणि संविधान धोक्यात येणार आहे, असा ठपका वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ठेवला आहे.

“हे विधेयक म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक वाटचालीवर आघात आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारेवर हा थेट हल्ला आहे. त्यामुळे आम्ही याविरोधात न्यायालयात लढा देणार आहोत,” असे आंबेडकर यांनी ठामपणे स्पष्ट केले.

“हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असून, संविधानाच्या मूळ तत्त्वांना छेद देणारे आहे. त्यामुळे आम्ही घटनात्मक मार्गाने विरोध करत राहू,” असे ते म्हणाले.

“जय फुले. जय शाहू. जय भीम. जय महाराष्ट्र. जय संविधान. जय भारत.” या घोषणांनी वंचित बहुजन आघाडीने आपल्या भूमिका अधिक स्पष्टपणे अधोरेखित केली.

हे विधेयक विधानसभेच्या निवड समितीकडे पाठवले गेल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने दिनांक 1 एप्रिल 2024 रोजी समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून आपली हरकत सादर केली होती आणि विधेयक मागे घेण्याची मागणी केली होती.

महाराष्ट्रात या विधेयकावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात या विरोधातील लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात