महाराष्ट्र ताज्या बातम्या

दीड लाख गोविंदांना विमा कवच देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील दीड लाख गोविंदांना विमा कवच देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्रिडा विभागाला दिले आहेत. आज दहीहंडी समन्वय समितीने मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही मागणी केली.

महाराष्ट्र शासनाने दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिल्यापासून या खेळात गोविंदांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विमा कवचाची गरजही वाढली आहे.

सध्या 75,000 गोविंदांना विमा कवच मिळते. यामध्ये वाढ करून 1,50,000 गोविंदांना विमा कवच देण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत क्रिडा विभागाला आवश्यक त्या कार्यवाहीचे निर्देश दिले.

दुर्दैवाने गोविंदाचा मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांचा विमा, अपघात झाल्यास 5 लाख, गंभीर जखमी झाल्यास अडीच लाख आणि किरकोळ जखमी झाल्यास 1 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.

शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडेलकर, गीता झगडे आणि अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल त्यांचे आभार मानले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात