महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: सांगलीच्या इस्लामपूरचे ‘ईश्वरपूर’ म्हणून नामांतर; राज्य सरकारची मान्यता, प्रस्ताव केंद्राकडे

मुंबई : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर गावाचे ‘ईश्वरपूर’ असे नामकरण करण्याच्या मागणीला अखेर मंजुरी मिळाली आहे. राज्य सरकारने याला मान्यता दिल्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत केली.

भुजबळ म्हणाले, “इस्लामपूर गावाचे ‘ईश्वरपूर’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे. हा विषय केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने राज्य सरकारने केंद्राला शिफारस केली आहे. केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर ‘इस्लामपूर’चे नाव अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ असे होईल.”

या नामांतराची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता हा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात