महाराष्ट्र ताज्या बातम्या

Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाचा समारोप; 17 विधेयकांना मंजुरी, राज्याच्या पुढील वाटचालीस दिशा – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारने विकासाला गती देणारी 17 विधेयके मंजूर केली असून, जनहिताचे अनेक निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

अधिवेशनात विशेष जनसुरक्षा विधेयक, अनुसूचित जाती-जमाती आयोगांना वैधानिक दर्जा, त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, झोपडपट्टी पुनर्विकास सुधारणा, मकोका कायद्यात बदल, खनिकर्म प्राधिकरण असे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरस्थिती नियंत्रण, शेतकऱ्यांसाठी मदत, दिव्यांगांना भत्ता वाढ, शिक्षक अनुदान, आणि मराठा समाजासाठी 750 कोटींच्या निधीचे वितरण जाहीर केल्याची माहिती दिली.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 गडकोट युनेस्को जागतिक वारशात समाविष्ट झाल्याचा गौरव व्यक्त करण्यात आला.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झोपडपट्टी पुनर्विकास, परवडणाऱ्या घरांची निर्मिती, महिलांसाठी वसतिगृह अशा निर्णयांचा उल्लेख केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा अभूतपूर्व प्रमाणात लक्षवेधी आणि अर्धातास चर्चांवर काम झाले, असे सांगितले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात