महाराष्ट्र ताज्या बातम्या

Congress : “शेतकरी आत्महत्या सुरू असताना मंत्री रमी खेळतात, सत्ताधाऱ्यांना लाज वाटत नाही” – हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई – राज्यात दररोज ६ शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्री विधानसभेत रमी खेळत बसल्याचा आरोप करत महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मंत्री व आमदार माजलेत, परंतु मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री काहीच कारवाई करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

लातूरमधील छावा संघटनेच्या आंदोलनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली मारहाण ही गुंडगिरी असून, त्या गुंडांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

राज्यातील काही मंत्री व अधिकार्‍यांच्या हनीट्रॅप प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात खोटी माहिती दिल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात