महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC elections :पालिका निवडणुका जवळ – कार्यकर्त्यांची फिल्डींग सुरू

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची धावपळ

By सचिन व्ही.

मुंबई : न्यायालयाने येत्या जानेवारीपर्यंत पालिका निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर ऐन सणासुदीच्या काळातच सर्व पक्षांतील कार्यकर्त्यांची विभागवार फिल्डींग जोरात सुरू झाली आहे.

नेत्यांनी कार्यकर्त्यांना फर्मान काढले आहे की, “वर्षानुवर्षे सोबत असलेल्या मंडळांना उत्सव साजरा करताना कुठेही कमी पडता कामा नये”. त्यामुळे विभागातील मंडळांची विचारपूस करणे, त्यांना आर्थिक मदत करणे आणि कार्यक्रमांत राजकीय उपस्थिती दाखवणे यासाठी कार्यकर्त्यांची चळवळ वाढली आहे.

इच्छुक उमेदवारांची रेलचेल

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी नगरसेवक आणि इच्छुक उमेदवार विभागात सक्रीय झाले आहेत. नवरात्रोत्सवातील मंडळांना सढळ हाताने मदत करणे, दिवाळीतील दीपोत्सव कार्यक्रमात सहाय्य करणे, आणि बदल्यात मंडळांच्या कार्यक्रमात आपल्या पक्षाचा बॅनर झळकवणे — या सूत्रावर उमेदवारांची धावपळ सुरू आहे.

वार्डात वाढलेली वर्दळ

महापालिकेच्या वार्ड कार्यालयांमध्ये गेल्या साडेतीन वर्षांत राजकीय वर्दळ कमी होती. पण निवडणुकीच्या हालचाली सुरू होताच कार्यकर्त्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. माजी नगरसेवक आणि नगरसेविका पुन्हा वार्डांत दिसू लागले असून विभागीय कार्यालयांमध्ये तक्रारींचा पाढा राजकीय कार्यकर्त्यांकडून अधिकाऱ्यांसमोर वाचला जात आहे.

बॅनरबाजीचे राजकारण

मंडळातील कार्यकर्त्यांनी सांगितले की, “यावेळी मदतीचा हात पुढे येतो आहे खरा, पण बदल्यात मोठ्या बॅनरवर नेत्यांसोबत दहा कार्यकर्त्यांचे फोटो लावणे बंधनकारक केले जात आहे.” प्रत्येक मंडळाच्या कार्यक्रमात पक्षाचा बॅनर झळकला पाहिजे, अशा फर्मानामुळे कार्यकर्ते मंडळांना मदत करताना बॅनरबाजीला प्राधान्य देत आहेत.

Rajkaran Bureau

About Author

1 Comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात