दोषींना ताबडतोब अटक करून कारवाई करण्याचे नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षकांना दिले निर्देश
ठाणे: – नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे चार पत्रकारांना मारहाण झाल्या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्याशी फोनवरून संवाद साधत पत्रकारांना मारहाण करणाऱ्या आरोपींना तत्काळ अटक करून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.
पत्रकारांना अमानुष मारहाण करणे हे सपूर्णपणे गैर असून शिंदे यांनी या घटनेचा निषेध केला असून, याप्रकरणी जे ही दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे स्पष्ट केले आहे