महाराष्ट्र ताज्या बातम्या

एल्फिन्स्टन पूल पाडण्याचा निर्णय चुकीच्या वेळी – काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांची टीका

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युती सरकार नियोजनशून्य पद्धतीने पायाभूत सुविधा क्षेत्रातील कामांचे आराखडे तयार करीत आहे, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते आणि शहररचनाकार अनंत गाडगीळ यांनी केली.

सध्या नवरात्रोत्सव सुरू असून काही दिवसांत दिवाळीचा सण आहे. अशा काळात एल्फिन्स्टन पूल पाडण्याचा निर्णय घेणे अत्यंत चुकीचे ठरल्याचे गाडगीळ म्हणाले. या निर्णयामुळे परळ, शिवाजी पार्क, माहीम ते दादर-माटुंगा परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

त्यामुळे पेट्रोलचा अनावश्यक वापर वाढत आहे, प्रदूषणाचे प्रमाणही वाढले आहे आणि जनतेच्या वेळेचे नुकसान होत आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या महाराष्ट्राला अशा निर्णयांमुळे आणखी तोटा सहन करावा लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गाडगीळ म्हणाले, “आज रस्त्यांवरील गर्दीमुळे अशी परिस्थिती असेल, तर ऐन दिवाळीत येथे चेंगराचेंगरीचा धोका निर्माण होऊ शकतो.”

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात