महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : “पूरग्रस्तांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई — राज्य शासन पूरग्रस्तांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. शेतकरी व आपत्तीग्रस्त नागरिकांना टंचाईप्रमाणेच सर्व सवलती आणि उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकरी सध्या गंभीर अडचणीत आहे. त्यामुळे बँकांना आपत्तीग्रस्तांकडून कर्ज वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळी आणि आवश्यक वस्तूंची किट्स पुरवण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे यांसारख्या नुकसानीवर केंद्राच्या निकषांबाहेर जाऊनही राज्य सरकार स्वतंत्र मदत देणार आहे. नुकसानीचे पंचनामे पुढील दोन-तीन दिवसांत पूर्ण होतील आणि पुढील आठवड्यात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाईल. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली आहे. त्यानंतर केंद्राकडून ती रक्कम ‘रिइम्बर्समेंट’ स्वरूपात मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत (मॅन्युअल) ‘ओला दुष्काळ’ अशी व्याख्या नाही. तरीदेखील, टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना पूरग्रस्त भागात लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात