महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : नगरपरिषद निवडणुकीत तणाव; ‘विरोधकांची पायाखालची वाळू सरकत आहे’ — माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप

महाड — महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज (मंगळवार) पार पडलेल्या महत्त्वपूर्ण मतदान प्रक्रिये दरम्यान शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे युवक उपाध्यक्ष सुशांत झांबरे यांना ५०–६० जणांच्या जमावाने घेरल्याची गंभीर घटना घडली.

ही घटना विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरल्याचे द्योतक असल्याची प्रतिक्रिया महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल माणिकराव जगताप यांनी दिली.

घटनेविषयी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही विशिष्ट गटांनी झांबरे यांना अडवून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सोबत असलेल्या सहकाऱ्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न झाला. इतकेच नव्हे, त्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली.

या दरम्यान, त्यांच्या अंगरक्षकाच्या (बॉडीगार्डच्या) रिव्हॉल्वर हिसकावण्याचाही प्रयत्न झाल्याचे जगताप यांनी माध्यमांना सांगितले.

स्नेहल जगताप म्हणाल्या, “निवडणुकीच्या दिवशी नागरिकांमध्ये भय आणि संभ्रम निर्माण व्हावा, यासाठी हे सर्व घडवले जात आहे. स्वतःच प्रकार घडवून नंतर ‘माझ्यावर अन्याय झाला’ असा आव आणण्याचा हा सपशेल प्रयत्न आहे. अशा कृत्यांना महत्त्व देणे योग्य नाही.”

त्या पुढे म्हणाल्या, “निवडणुकीत पराभव निश्चित असल्याची जाणीव विरोधकांना झाली आहे. त्यामुळेच ते असे निंदनीय आणि भ्याड प्रकार करत आहेत.”

जगताप यांनी महाडकरांना आवाहन केले, “कोणत्याही अफवांना बळी न पडता, शांततेत मतदान करा. लोकशाहीचा अधिकार भीतीशिवाय बजावणे अत्यावश्यक आहे.”

त्यांनी पुढे सांगितले, “महाड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित आहे. मी, खा. सुनील तटकरे आणि ना. प्रवीण दरेकर महाडच्या नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”

घटनेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही जगताप यांनी केली.

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात