महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ६६० अब्ज डॉलर्स पार; २०३२ पर्यंत वन ट्रिलियन डॉलर लक्ष्य गाठू : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सध्या सुमारे ५१ लाख कोटी रुपये इतकी असून राज्याने ६६० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. ५०० अब्ज डॉलर्सपेक्षा मोठी अर्थव्यवस्था असलेले महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. आज राज्याची अर्थव्यवस्था बेल्जियम देशाइतकी असून जगातील चौदाव्या क्रमांकाची आहे. दुष्काळी स्थिती उद्भवली नाही, तर २०३२ पर्यंत महाराष्ट्र ‘वन ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्था हे लक्ष्य निश्चित गाठेल, असा विश्वास मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम परिषदेत केलेल्या करारांचे समर्थन केले. दावोस हा जागतिक आर्थिक मंच असून अनेक देश त्यात सहभागी होतात. २०२५ साली झालेल्या ४८ करारांपैकी ८८ टक्के करार विविध टप्प्यांवर प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण महाराष्ट्रात, खानदेशासह नंदुरबारसारख्या जिल्ह्यांतही गुंतवणूक होत असल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी ३९ टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली असल्याचा दावा त्यांनी केला.

बेरोजगारी संदर्भात विरोधकांनी चुकीची आकडेवारी मांडल्याचा आरोप करत त्यांनी सध्या बेरोजगारी दर ३.३ टक्के असल्याचे सांगितले. राज्यात १ लाख २० हजार ४८९ सरकारी नियुक्त्या करण्यात आल्या असून लवकरच नव्या भरतीची प्रक्रिया सुरू होईल, अशी घोषणा त्यांनी केली. महाराष्ट्र हे देशाचे स्टार्टअप कॅपिटल बनले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मराठी शाळा बंद पडत असल्याच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी सांगितले की, राज्यातील ८४ टक्के शाळा मराठी माध्यमाच्या असून त्यात ७० टक्के विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुमारे १६ हजार शाळा स्वयंअर्थसहाय्यित आहेत. तर ६५ लाख विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांत शिक्षण घेतात. जिल्हा परिषद शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध असून ५० हजार विद्यार्थी पुन्हा जिल्हा परिषद शाळांत दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईतील गिरणी कामगारांना आतापर्यंत १२,४५३ घरे वितरित करण्यात आली असून मुंबई परिसरात पुढील घरांसाठी लवकरच भूमिपूजन होईल, असे त्यांनी सांगितले. हिंदी भाषा अभ्यासक्रमात दुसरी भाषा म्हणून समाविष्ट करण्याचा निर्णय हा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

इतिहासासंदर्भातील वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी काही व्यक्तींनी देशाच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप केला. काँग्रेस सरकारच्या काळात देशाला खरा इतिहास शिकवला गेला नाही, त्यामुळे औरंगजेबासारख्या व्यक्तींना काही जण नायक मानतात, असे त्यांनी नमूद केले.

मंत्रालयातील औषध प्रशासन विभागात एसीबीने केलेल्या कारवाईचे समर्थन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, एसीबी ही स्वतंत्र यंत्रणा आहे. तक्रार आल्यास मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचारी किंवा अधिकारी असले तरी कारवाई करण्याचे अधिकार त्यांना आहेत.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात