महाराष्ट्र ताज्या बातम्या

नायर डेंटल कॉलेज वसतिगृहातील अस्वच्छतेवर कारवाईची मागणी; विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता

मुंबई : मुंबईतील **नायर डेंटल कॉलेजच्या वसतिगृहात अस्वच्छ व असुरक्षित परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार समोर आली असून, त्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मूलभूत व दर्जेदार सुविधा मिळणे अपेक्षित असताना वसतिगृहातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, वसतिगृहात अनेक दिवस नियमित स्वच्छता झालेली नाही. काही मजल्यांवर कचरा साचल्याचे, स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय असल्याचे तसेच परिसरात दुर्गंधी पसरल्याचे सांगितले जात आहे. या परिस्थितीत सुमारे २०० ते ३०० विद्यार्थी, त्यात इंटर्न डॉक्टरांचाही समावेश, राहण्यास बाध्य असल्याचेही समोर आले आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाशी संबंधित हा गंभीर प्रश्न असल्याचे नमूद करत संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच अशा वातावरणाचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि शैक्षणिक कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो, अशीही चिंता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सफाई कंत्राटदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्यामुळे स्वच्छतेचे काम काही दिवसांपासून ठप्प असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण परिस्थितीबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थांमधील वसतिगृह व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन व जबाबदार यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.


विद्यार्थ्यांचे आरोग्य प्रश्न

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात