महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाराष्ट्रात २३ हजार किमी नवे रस्ते; मुख्यमंत्री सडक योजनेची विधानसभेत घोषणा

Maharashtra Rural Development Minister Jaykumar Gore speaking in the Maharashtra Assembly during a discussion on rural infrastructure and Mukhyamantri Sadak Yojana.

मुंबई: राज्यातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत सुमारे २३ हजार किलोमीटर नवे रस्ते बांधण्यात येणार आहेत, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत केली.

विभागाच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. मंत्री गोरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सडक योजनेअंतर्गत आतापर्यंत १६,९७२ किलोमीटर रस्त्यांची कामे मंजूर करण्यात आली असून त्यासाठी ७,२८० कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ मंजूर करण्यात आले आहेत. तसेच आणखी १० जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल सुरू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत ४० नवीन ग्रामपंचायतींना मंजुरी देण्यात आली असून ८४ तांड्यांना ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

तसेच ‘सर्वांसाठी घरे’ योजनेंतर्गत राज्यात मोठ्या प्रमाणावर काम झाले असून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला २९ लाख घरे मंजूर करण्यात आली आहेत. देशात इतक्या मोठ्या प्रमाणावर घरे मंजूर झालेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचा दावा मंत्री गोरे यांनी केला.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात