महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनचा वेळ वाया घालवण्याचा उबाठा गटाचा कट

उबाठा गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी निवडणूक आयोगाच्या अधिका-यांना अपात्रतेच्या कारवाईत साक्षीदार म्हणून बोलावण्यासाठी विधानसभा अध्यक्षांसमोर केलेली याचिका म्हणजे उबाठा गटाचा सुनावणी लांबवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला. सुनावणीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी पक्षाची बाजू मांडताना त्यांनी हे मत व्यक्त केले. उबाठा गटाच्या या उद्योगामुळे नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाचा कालावधी देखील नाहक वाया जाणार असल्याचाही आरोप सामंत यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात खटला दाखल करताना शपथेखाली खोटे बोलणे, खोटी आणि बनावट कागदपत्रे सादर करण्याचा प्रभू यांचा प्रयत्न उलटतपासणी दरम्यान उघड झाला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बजावलेल्या व्हीपचा पुरावा म्हणून माननीय सभापतींसमोर सादर केलेल्या ईमेल्सच्या स्वरूपात भौतिक पुरावे तयार केल्याचे आता पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे.आम्ही या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केली असून प्रभू हे निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांना कारवाईत सहभागी करून घेण्याची मागणी करून कारवाईला विलंब करत आपणच केलेल्या चुकीवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत, असाही गौप्यस्फोट सामंत यांनी केला. सुनील प्रभू यांच्याकडून त्यांची लबाडी आणि फसवणूक लपविण्यासाठी हे डावपेच अवलंबले जात आहेत असे स्पष्टपणे दिसते.सुनावणी सुरू झाल्यावर असे डावपेच पुढे करून ती लांबवण्याचा केलेला हा प्रयत्न आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा अमूल्य वेळही बाधित होणार आहे.निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना सुनावणीत सहभागी करून घेण्याची केलेली मागणी ही विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु असलेली सुनावणी लांबवण्याचा कटाचा एक व्यापक भाग आहे. यामुळे वैधानिक कामकाजाच्या हिताला बाधा येईल आणि राज्यातील जनतेचेही मोठे नुकसान होईल. त्यामुळे अशा डावपेचांचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात