महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपाच्या विजयाचा मुंबईत जोरदार जल्लोष

पनौती कोण आणि चुनौती कोण आज काँग्रेसला कळेल!

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार

मुंबई: देशातील गरिब, श्रमिक, शेतकरी, कष्टकऱ्यांची सेवक म्हणून सेवा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला आजच्या निकालानंतर कळले असेल की, पनौती कोण आणि चुनौती कोण? अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यात भाजपाचा झालेला दणदणीत विजय आणि तेलंगणा मध्ये झालेली वाढ याबाबत आज मुंबईत भाजपातर्फे प्रदेश कार्यालयाजवळ मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार. अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आमदार प्रविण दरेकर, प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ, माजी मंत्री राम शिंदे, राज पुरोहित, अतुल शाह यांच्या सह पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल ताशांचा गजर करीत, नरेंद्र मोदी यांच्या जयजयकार करणाऱ्या घोषणा देत, मिठाई वाटून जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी. आमदार. अँड आशिष शेलार म्हणाले की, चार राज्याच्या निकालामध्ये जनतेने व्देषाचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस आणि इंडिया आघाडीला झिडकारून जनसेवा करणाऱ्या भाजपाच्या बाजूने कौल दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कणखर नेतृत्व, अमितभाई शाह यांची रणनीती आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलेली व्युहरचना तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत याचे हे यश आहे. आम्ही हा विजय नम्रपणे स्विकारला आहे. या निवडणुकीत मेहनत घेणाऱ्या कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांनी यावेळी अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या गल्लीत उभं राहून रोज एक नेता सांगत असतो, “होय मी मर्द आहे..!” त्यांचे बिनकामाचे सरदार पत्रकार पोपटलाल म्हणतात, “देशाला पुरुष हवाय!” अरे तुम्हाला मिडियाचे चार कॅमेरे सोडलं तर या देशात विचारतयं कोण? आज कळलं का? मर्द कोण आणि मर्दानकी काय असते ती, असा सणसणीत टोलाही यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी लगावला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात