महाराष्ट्र ताज्या बातम्या

एस टी बँक कारभाराची चौकशी; दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

X: @therajkaran

नागपूर: स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक (State Transport co-op Bank) संचालक मंडळाने मनमानी पद्धतीने कारभार करत कर्जावरील व्याजाचे दर 14 टक्क्यावरून 7 टक्के इतके केले. त्यामुळे बँकेचा ‘क्रेडीट डिपॉझिट रेशो’ (Credit Deposit Ratio) खराब झाला, अशी तक्रार रिझर्व्ह बँकेकडे (RBI) केली आहे. या अधिकोषामधील अनियमिततेचे चौकशी आदेश दिले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाईल, असे उत्तर सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज विधानपरिषदेत शिवसेना सदस्य (उद्धव ठाकरे) अनिल परब (Anil Parab) यांच्या प्रश्नावर प्रश्नोत्तर तासात दिले.

वळसे-पाटील म्हणाले, “कर्जावरील व्याज दर कमी केल्याने भीतीपोटी ठेवीदारांनी (depositors) 180 कोटी रुपयांच्या ठेवी काढून घेतल्या. या अधिकोषातील आर्थिक स्थिती चांगली आहे. ठेवीदारांनी काळजी करू नये. राज्य शासन योग्य ती काळजी घेत आहे,” असे ते म्हणाले, ‘अधिकोषासंबंधी आलेल्या सर्व तक्रारींची शासनाकडून विभागीय सहनिबंधक यांच्याकडून आवश्यक ती कार्यवाही चालू आहे, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

Also Read: मध्यान्ह भोजनातून विषबाधा; सरकारला धरले धारेवर

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात