महाराष्ट्र ताज्या बातम्या

सेलेब्रिटी विद्यार्थ्याना देणार १८ कलांचे ऑनलाईन शिक्षण : दीपक केसरकर 

X : @therajkaran

मुंबई: राज्यभरांतील ६५ हजार शाळांतील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळून व्यक्तीमत्त्व विकास व्हावा, यासाठी देशातील सेलेब्रिटी यांच्याकडून १८ कलांचे ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, संगीत, गायन, नाट्य, वक्तृत्व, चित्रकला आदी कलांचा यामध्ये समावेश आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा ऑनलाइन कलाशिक्षण प्रकल्प अंमलात येईल. विविध कला क्षेत्रांतील तज्ञ व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने थेट संवाद साधून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी या कला किती आत्मसात केल्या आहेत, याची चाचपणी घेण्यासाठी याविषयी स्पर्धाही घेतल्या जाणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकसित होण्यास साहाय्य होईल. शिक्षणमंत्री केसरकर पुढे म्हणाले, यापुढे सोमवार ते शुक्रवार पाठ्यपुस्तकातील अभ्यासाचे असतील. मात्र, शनिवार विद्यार्थ्यांसाठी आनंददायी असेल. शनिवारी विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन करावे अशी योजना आहे. खेळ, संगीत, कृषी ज्ञान, आदी उपक्रमही असतील. यासाठी शिक्षण विभागाकडून आराखडा तयार करण्यात येत आहे.

राज्य शासनाने प्राथमिक शाळांची २ दिवसांपूर्वीच वेळ ९ वाजताची केली आहे, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हा बदल करण्यात आला आहे. ज्या शाळा तसे करणार नाहीत, त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण होणार नाही, असा इशारा केसरकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिला.

Also Read: होळकर-शिंदे-पवार-गायकवाड राज घराण्यांचा इतिहास पुस्तकरूपाने प्रकाशित करणार : मंत्री दीपक केसरकर

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात