महाराष्ट्र ताज्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या नव्या आराखड्यात भव्य पुतळ्याचा समावेश – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा नवा भव्य आराखडा तयार करण्यात आला असून, या परिसरातच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केले.

शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे ज्येष्ठ सदस्य भास्कर जाधव यांनी विधानसभेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाराजांच्या भव्य पुतळ्याची उभारणी कधी होणार, यासंबंधी प्रश्न उपस्थित केला. याचबरोबर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे ‘जगन्नाथ शंकर शेठ’ असे नामकरण कधी होणार, याबाबतही त्यांनी विचारणा केली.

उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या संदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. अंतिम निर्णय अद्याप बाकी असून, केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात