महाराष्ट्र ताज्या बातम्या

लातूर घटनेनंतर अजित पवार यांची कठोर कारवाई; सूरज चव्हाणचा राजीनामा, पण कोकाटेंचा काय?

मुंबई : लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या झटापटीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत तातडीने कारवाई केली.

“लातूरमध्ये काल घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला मी ठामपणे विरोध करतो. समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय्य मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता आणि बंधुत्वाच्या मूल्यांवर उभी आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

या घटनेनंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांना तात्काळ राजीनामा देण्याचे आदेश दिले.
“पक्षाच्या मूल्यांविरुद्ध जाणाऱ्या कोणत्याही वर्तनाला माफ केले जाणार नाही,” असा कडक इशारा त्यांनी दिला.

मात्र या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी आणखी मोठा सवाल उपस्थित केला आहे.

“सूरज चव्हाणचा राजीनामा घेतल्याबद्दल दादांचे आभार. पण खरे कारण वेगळे आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधीमंडळाच्या सभागृहात रम्मी खेळल्यामुळे हा वाद निर्माण झाला. त्यामुळे कोकाटेंचा राजीनामा घेणे आवश्यक आहे,” असा थेट आरोप माने यांनी केला.

या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत विसंवाद उफाळून आला असून लातूरची घटना सत्ताधारी पक्षातील वादळाचे केंद्रबिंदू ठरत आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात