महाराष्ट्र

बदलापूर एन्काऊंटरवरून भाजप सरकारवर आरोपांचे सावट

मुंबई: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या फेक एन्काऊंटर प्रकरणात न्यायालयीन चौकशीत पाच पोलिसांना जबाबदार ठरवण्यात आले आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार, शिंदेच्या हाताळलेल्या बंदुकीवर त्याचे बोटांचे ठसेच नव्हते, असेही उघड झाले आहे.

या प्रकरणात भाजपशी संबंधित संस्थाचालकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, तर दुसरीकडे अक्षय शिंदेचा फेक एन्काऊंटर करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या एन्काऊंटरचे श्रेय घेतले होते.

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर टीका करत, “फक्त मतांसाठी मांडलेला फेक नरेटिव्ह आणि बाजार आता उघडकीस येत आहे,” असे मत व्यक्त केले. त्यांनी या प्रकरणातील पोलिसांसोबतच तत्कालीन मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांवरही जबाबदारी ठेवल्याचे सांगितले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात