महाराष्ट्र ताज्या बातम्या

आणि कासवाने पुन्हा शर्यंत जिंकली…

पनवेल : ससा आणि कासव यांच्या शर्यतींची गोष्ट आपणा सर्वांनाच माहिती आहे. अशीच एक महत्वाची म्हणजे जीवन मरणाची शर्यंत आज कासवाने पुन्हा जिंकली असून कासव पुन्हा वडाळे तलावात आपल्या मुक्कामी सुखरूप पोहचले.

वडाळे तलाव परिसरात एका कासवाच्या तोंडात गळ अडकल्याची माहिती मुकुंद कोळी यांनी अग्निशमन केंद्राला दिली. अग्निशमन विभागाचे वाहन घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी पोहोचल्यावर अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पाहिले की, कासवाच्या तोंडात गळ अडकलेला आणि तो अत्यवस्थ आहे. त्यांनी कासवाला सुरक्षितपणे पनवेल महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे सुपूर्त केले.

महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मधूलिका लाड व डॉ. भगवान गीते यांनी तात्काळ दखल घेत कार्यवाही केली. तालुका पशू संवर्धन विभागाचे हेमंत तोडकर यांच्या मदतीने त्याच्या तोंडातील गळ भूल देऊन यशस्वीरित्या काढण्यात आला.

या कासवाची वैद्यकीय तपासणी करून, कोणतीही इजा नसल्याची खात्री झाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यास पुन्हा वडाळे तलावात सोडण्यात आले. यावेळी उपायुक्त प्रसेनजीत कारलेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर उपस्थित होते.

ही संपूर्ण मोहीम अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे व पशुवैद्यकीय विभागाच्या सहकार्यामुळे शक्य झाली. या कार्याबद्दल आयुक्त मंगेश चितळे यांनी अग्निशमन विभाग व पशुवैद्यकीय विभागाचे अभिनंदन केले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात