महाराष्ट्र ताज्या बातम्या

संविधान सम्मान महासभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे!

वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

मुंबई : देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असलेल्या २५ नोव्हेंबरची पुन्हा एकदा आठवण करून देत वंचित बहुजन आघाडीने “संविधान सम्मान महासभा” आयोजित करण्याची घोषणा केली आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शेवटचे भाषण भारतीय लोकशाहीचे मार्गदर्शक तत्त्व आहे. या भाषणात त्यांनी राष्ट्रापेक्षा धर्माला प्राधान्य देण्याच्या धोक्यांबाबत इशारा देत समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित सामाजिक लोकशाहीची आवश्यकता स्पष्ट केली होती.

या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने संविधानाच्या गौरवार्थ “संविधान सम्मान महासभा” आयोजित करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान, दादर, मुंबई येथे संध्याकाळी 4. वा. या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

या महासभेत सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्ये आणि संविधान संरक्षणाच्या मुद्द्यांवर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी संविधानप्रेमी नागरिक, फुले–शाहू–आंबेडकर विचारवंत, मानवतावादी आणि सर्व लोकशाहीवादी जनतेला या महासभेस उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

देशभरातील मान्यवर या संविधान सम्मान महासभेला उपस्थित राहणार आहेत.

सिद्धार्थ मोकळे
प्रदेश उपाध्यक्ष तथा मुख्य प्रवक्ता
वंचित बहुजन आघाडी
8007009364

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात