महाराष्ट्र ताज्या बातम्या

Assembly Session – मागाठाणेतील शुक्ला कंपाऊंड पाडकामावर विधानसभेत संतापाचा स्फोट

बाऊन्सर्ससोबत अमानुष पाडकाम?—अतिरिक्त मुख्य सचिवांकडून ६० दिवसांत चौकशी

नागपूर – मुंबई उपनगरातील मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शुक्ला कंपाऊंड येथे 1967 पासून अस्तित्वात असलेल्या निवासी व व्यावसायिक बांधकामांचे विकासक–मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि बाऊन्सर्सच्या उपस्थितीत अमानुष पाडकाम झाल्याचा धक्कादायक आरोप आज विधानसभेच्या विशेष बैठकीत करण्यात आला. सत्तारूढ पक्षाच्या सदस्यांनीही या कारवाईवर रोष व्यक्त करत मंत्र्यांना कठोर शब्दांत धारेवर धरले.

शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित करताना सांगितले की, पाडकामाच्या वेळी बाऊन्सर्सनी परिसरातील हिंदू मंदिर बंद केले, रहिवाशांना घरातून सामान बाहेर काढू दिले नाही, आणि संपूर्ण कारवाई मनुष्यत्वाला काळिमा फासणारी होती. “ही सर्व मराठी माणसे, त्यांच्या कुटुंबांची वर्षानुवर्षांची घरे आहेत,” असे सुर्वे भावनिक होत सांगत होते.

त्यांना जोरदार साथ देताना मंत्री मनिषा चौधरी, तसेच ज्येष्ठ विरोधी सदस्य भास्कर जाधव यांनीही पाडकाम प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

यावर प्रतिसाद देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले की, पाडकामाची संपूर्ण कागदपत्रे तपासली जातील, बाऊन्सर्स कोणी नियुक्त केले, कोणाच्या आदेशाने ते आले, याचीही सखोल चौकशी केली जाईल आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अतिरिक्त मुख्य सचिवांकडून ६० दिवसांत केली जाईल.

सभागृहात पाडकामातील संभाव्य अनियमितता, नागरिकांवरील अमानुष वागणूक आणि विकासक–मनपा अधिकाऱ्यांच्या संगनमताच्या आरोपांवरून वातावरण तणावपूर्ण झाले होते.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात