महाराष्ट्र ताज्या बातम्या

परळी तालुक्यातील भरत गीते यांच्या टॉरल इंडिया कंपनीचा महाराष्ट्र शासनाशी दावोसमध्ये करार

मुंबई: परळी तालुक्यातील नंदागौळ गावचे सुपुत्र भरत गीते यांच्या टॉरल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने दावोस येथे सुरू असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्र शासनाशी दोन प्रकल्प उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या प्रकल्पांद्वारे सुपा आणि अहिल्यानगर येथे अत्याधुनिक ॲल्युमिनियम कास्टिंग सोल्युशन्स तयार करून जागतिक स्तरावर निर्यात केली जाणार आहे.

या प्रकल्पांसाठी ₹500 कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाणार असून, 1200 हून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भरत गीते आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. त्यांनी हा परळीकरांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचेही आभार मानले आहेत.

भरत गीते यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामगिरीने परळी तालुक्याचे नाव जागतिक पातळीवर नेल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात