महाराष्ट्र ताज्या बातम्या

मराठी भावगीत आणि भक्तीगीत खाजगी रेडिओवरुन नियमित प्रसारित करा : सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार

मुंबई: ग्रामोफोन आणि कॅसेटच्या जमान्यातील मराठी भावगीत, भक्तीगीते आजही मराठी मनावर अधिराज्य करणारी आहेत त्यामुळे आजच्या नव्या रेडिओ स्टेशनवरुन ही भावगीत व भक्तीगीते नियमित प्रसारित करा, अशी सूचाना सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज येथे केली.

मंत्रालयातील दालनामध्ये एँड आशिष शेलार यांनी आज विविध खाजगी रेडिओ क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला. रेडिओ या माध्यमातून मराठी भाषेला प्राधान्य मिळावे तसेच सरकार आणि खाजगी रेडिओचे नवे जग यामध्ये समन्वय असावा यासाठी हा संवाद आयोजित करण्यात आला होता.

यावेळी भाजपा पदाधिकारी हेनल मेहता यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत रेड एफ एफ, रेडिओ सीटी 91.1, यांच्यासह या क्षेत्रातील प्रतिनिधी, आरजे उपस्थित होते.

यावेळी रेडिओ क्षेत्रातील आव्हाने आणि अडचणी याबाबत ही चर्चा करण्यात आली. तर मंत्री शेलार यांनी सांगितले की, आमच्या बालपणीचा काळ हा आकाशवाणीवरुन लागणाऱ्या गीतांशी जोडलेला होता. आमची पिढी ही त्याकाळी रेडिओ वरुन वाजणाऱ्या गीतांच्या एका प्रभावात वाढलेली आहे. महाराष्ट्रातील दर्शक हे भाव आणि भक्तीगीतांशी एका वेगळ्या नात्याने जोडलेले आहेत. आजही शहरापासून खेड्या पर्यंत सत्यनारायणाची पुजा असली की, प्रल्हाद शिंदे यांची अजरामर गीते वाजल्याशिवाय सत्यनारायणाची पुजा आहे असे वाटतच नाही. अशाच प्रकारे कॅसेटच्या जमान्यातील भावगीत आणि भक्ती गीतांशी महाराष्ट्रातील तमाम श्रोतावर्ग जोडला गेलेला आहे त्यामुळे ही गाणी पुन्हा खाजगी रेडिओवरुन प्रसारित करा, महाराष्ट्र तुम्हाला नक्की प्रतिसाद देईल, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात