महाराष्ट्र ताज्या बातम्या

तुकाराम मुंडे यांच्यावर नियमबाह्य पेमेंट्स व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप; विधानसभेत गदारोळ, कामकाज तहकूब

नागपूर – सततच्या बदल्यांमुळे राज्यभरात चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. नागपूरमधील भाजप सदस्याने मुंडे यांनी हस्तकाकरवी स्वतःला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप विधानसभेत करताच सभागृहात एकच खळबळ उडाली, आणि गदारोळामुळे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

भाजप आमदार कृष्ण खोपडे आणि प्रवीण दटके यांनी आरोप केला की महाविकास आघाडी सरकारच्या काळात नागपूर महापालिकेचे आयुक्त असताना, तुकाराम मुंडे यांनी शासनाने अधिकृत नियुक्ती न देता नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा प्रभार स्वतःकडे घेतला. सीईओचे अधिकार नसतानाही त्यांनी कोट्यवधींची नियमबाह्य देयके आपल्या पसंतीच्या कंत्राटदारांना केली, आणि सुमारे २० कोटी रुपयांचे पेमेंट्स अशाप्रकारे करण्यात आल्याचा गंभीर आरोप खोपडे यांनी केला.

खोपडे यांनी सांगितले की मुंडे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पातील महिला अधिकाऱ्यांना धाक दाखवला आणि १७ कर्मचाऱ्यांना कोणतेही ठोस कारण नसताना निलंबित केले. याहून गंभीर म्हणजे, मुंडे यांच्या समर्थकांकडून आपल्या जीवाला धोका असल्याची धमकी देण्यात आली, असे विधान सभागृहात केल्याने वातावरण आणखी तापले.

खोपडे आणि दटके यांनी तुकाराम मुंडे यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, त्यांना ताबडतोब अटक करावी अशी जोरदार मागणी केली.

प्रकरणाची गंभीरता पाहता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप करत सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. मात्र समाधान न झाल्याने आमदार आक्रमक झाले आणि सभागृहात गदारोळ सुरू झाला. परिणामी तालिका अध्यक्षांना दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करावे लागले.

सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की ते वस्तुस्थिती जाणून घेऊन शक्य तितक्या लवकर सभागृहात औपचारिक निवेदन करतील.

सदानंद खोपकर

सदानंद खोपकर

About Author

सदानंद खोपकर (Sadanand Khopkar) हे ज्येष्ठ पत्रकार असून 40 हून अधिक वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत. ते गेली अनेक वर्षे मंत्रालय, विधिमंडळ आणि राजकीय पत्रकारिता करत आहेत. त्यांची संपामुळे उद्ध्वस्त झालेला गिरणगाव, तेथील मूळ संस्कृतीचा शोध यासह विविध विषयावरील 20 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांची अनेक गीते असून पुस्तकांची अभिवाचन हा त्यांचा आवडत विषय. त्यांची अनेक अभिवाचने यू-ट्यूबवर उपलब्ध आहेत. राजकीय पत्रकारिता करतानाच त्यांनी सांस्कृतिक आणि साहित्यिक पत्रकारितेचा वसा जपला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ना चुकता हजेरी लावणारे आणि त्यावर लेखन करणारे अशीही त्यांची साहित्य जगतात ओळख आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात