महाराष्ट्र ताज्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महा हॅकेथॉन चॅलेंज १.०’ स्पर्धेचे उद्घाटन

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समस्यांवर नवकल्पनाशील उपाय शोधण्यासाठी आयोजित ‘महा हॅकेथॉन चॅलेंज १.०’ स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे झाले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर पार पडलेल्या या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार, तसेच अन्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

ही स्पर्धा महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभाग आणि केंद्र सरकारच्या ‘भाषिणी’ या उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. टेक्नॉलॉजी इनोव्हेटर्स, संशोधक, स्टार्टअप्स आणि आंत्रप्रुनर्स यांच्यासाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेचा उद्देश विविध समस्यांवर प्रभावी आणि स्वदेशी उपाय शोधणे हा आहे.

स्पर्धेतील विषय
1. कृत्रिम बुद्धिमत्तेचा शासन व्यवस्थापनात वापर
2. आपत्ती व्यवस्थापनात ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग
3. संवेदनशील आणि प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये ड्रोनविरोधी तंत्रज्ञानाचा वापर
4. ‘भाषिणी’च्या मदतीने थेट भाषांतर सुविधा

स्पर्धेचे वेळापत्रक
• ११ फेब्रुवारी २०२५ – स्पर्धेचे उद्घाटन
• १४ फेब्रुवारी २०२५ – स्पर्धकांसाठी शंका समाधान सत्र
• २२ फेब्रुवारी २०२५ – नोंदणीसाठी शेवटची तारीख
• २८ फेब्रुवारी २०२५ – सादर कल्पनांचे मूल्यमापन व १० गटांची निवड
• ७ मार्च २०२५ – प्रत्येक गटातील टॉप ५ संघांची निवड
• २० मार्च २०२५ – अंतिम सादरीकरण व विजेत्यांची घोषणा
• २५ मार्च २०२५ – विजेत्यांची अधिकृत घोषणा

बक्षीस व सवलती
• प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजयी संघांना त्यांच्या सोल्यूशनच्या अंमलबजावणीसाठी फंडिंग आणि सपोर्ट मिळेल.
• पहिल्या तीन गटांना – ₹१५ लाख आणि प्रमाणपत्र
• चौथ्या गटांना – ₹५ लाख आणि प्रमाणपत्र
• विजेत्या सोल्यूशन्स महाराष्ट्र शासनाच्या वतीने ऑपरेशन व मेंटेनन्ससाठी नियुक्त केली जातील.
• पहिल्या तीन गटांना ₹१.५ लाख प्रतिवर्ष
• चौथ्या गटांना ₹५०,००० प्रतिवर्ष

अधिक माहितीसाठी संपर्क:

https://bhashini.gov.in/sahyogi/startup/maha-innovation

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात