महाराष्ट्र ताज्या बातम्या

विकसित महाराष्ट्र २०४७’ सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत आवाहन

ajit pawar

मुंबई – ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ या व्हिजन डॉक्युमेंटच्या तयारीसाठी सुरू असलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केले.

राज्य सरकारने ६ मे ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान १५० दिवसांचा विशेष कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली असून, यामध्ये दीर्घकालीन, मध्यमकालीन व अल्पकालीन उद्दिष्टांवर आधारित व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी १६ क्षेत्रनिहाय गट स्थापन करण्यात आले आहेत.

१८ जून ते १७ जुलै २०२५ दरम्यान नागरिकांचे मत, अपेक्षा आणि प्राथमिकता जाणून घेण्यासाठी ऑनलाइन सर्वेक्षण आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये भाग घेण्यासाठी नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या QR कोड किंवा लिंकवरून व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटद्वारे प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

विधानसभेतील सर्व सदस्य, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नागरिकांना प्रोत्साहित करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात