महाराष्ट्र ताज्या बातम्या

जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध – संभ्रम दूर करून नव्याने विधेयक आणा : आ. अभिजित वंजारी

मुंबई – जनसुरक्षा विधेयकाबाबत जनतेत संभ्रम आहे, तो दूर करूनच नव्याने विधेयक आणावे, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे सदस्य आ. अभिजित वंजारी यांनी आज केली. १२ हजारांहून अधिक व्यक्ती व संघटनांनी सुचना व आक्षेप नोंदवले असून जनसुनावणी झाली नाही, असा आरोप त्यांनी केला.

विधान परिषदेत वंजारी म्हणाले, नक्षलवाद संपवण्यासाठी हे विधेयक असल्याचे सरकार म्हणते, पण शीर्षकात त्याचा उल्लेख नाही. गृहमंत्री अमित शाह यांनी ७२% नक्षलवाद संपवल्याचे सांगितले, ते कोणत्या कायद्याने? टाडा, पोटा, युएपीए, मकोका हे कायदे आधीच अस्तित्वात असून ते पुरेसे कठोर आहेत.

नव्या विधेयकात दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्याची तरतूद असून संस्थेचे सदस्य, देणगीदार यांच्यावर कारवाईची मुभा दिली आहे. सरकारकडून विरोधाचा आवाज दाबण्यासाठीच हा कायदा आणला जात असल्याचा आरोपही वंजारी यांनी केला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात